असंख्य वादळं येतील,
रचलेला डाव क्षणात विखुरला जाईल,
जे योजिले त्याच्या विपरीत होईल,
सगळं संपलं ही भावना जोर धरेल...!!
पण तेव्हा 'तू' खचू नकोस.
नव्याने पुन्हा आवरायला घे,
झालेल्या चुका सुधारायला घे,
अनुभवातून धडा घे.
जिथं संपलं वाटलं तिथूनचं खरी सुरवात आहे,
फक्त तसं पहायला जमव,
आयुष्य खूप सुंदर आहे,
त्याची सुंदरता पहायला जमव...!!
#सहजचं
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
No comments:
Post a Comment