Monday, March 16, 2020

प्रवासात भेटलेले 'कवडसे'...!!!

       ईस्पितस्थळी पोहचताना आयुष्याच्या प्रवासात भेटलेल्या काळ्याकुट्ट  घनदाट जंगलातल्या अंधाऱ्या पायवाटेवरून चालताना, इथपर्यंतच्या प्रवासात जगलेल्या क्षणांचे कवडसे डोकावत असतात..!
        आपण त्या कवडसांबरोबर थोडाकाळ का होईना रमत गमत चालायचं असतं...! पण कितीवेळ रममाण व्हावं यालाही मर्यादा येतेच....
       काळ्याकुट्ट अंधाऱ्या वाटेवरुन चालताना , पाऊलवाट अगदी दिसेनाशी झाली तर हेच कवडसे वाटेत आशेचा किरण दाखवतात....अन् थोडावेळ का होईना, पाऊलवाट प्रकाशित करतात.. आपल्या साथीला आहेत याचा अभासातील भास देतात...!!
        त्यामुळे आयुष्यात जगलेले क्षण हे या कवडश्यांसारखं  काम करत असतात.....!
       कधी वाटलं, वाट दिसेनाशी झालीय तर, या क्षणांना जवळ करणं आवश्यक असतंय...!! वाट दिसेनाशी होते म्हणजे त्यात त्या वाटेचा दोष नसतोच, गरज असते ती दिव्य दृष्टीने पाहण्याची...!! गरज असते साथीची, आपल्या म्हणवणाऱ्या कोणाचीतरी...!!
अन् गरज असते ती स्वतःचा हात स्वतः आवेगाने घट्ट पकडण्याची, जो कोणत्याही कठीण प्रसंगी साथ सोडत नाही. दरम्यानच्या काळात जगलेल्या क्षणांच्या पाऊलखुणाच, आपली साथ निःसंकोचपणे देऊ शकतात अन्य कोणीही नाही अन् शहाण्याने ती अपेक्षा ही धरू नये...!!
         कवडश्यानीच का साथ द्यावी...??, कवडश्यांमुळेच अंधुक वाट का दिसावी...??  पूर्ण वाट लक्खं प्रकाशित का होऊ नये..?? याच्या फ़ंद्यात आपण पडायचं नसतं...!!
          दमून आलेल्या पंथास्त्याला वटवृक्षाने विचारलं आहे का की, तू माझ्याच सावलीत का विसावला...??  असं कधी ऐकीवात आहे का....? नाही ना, मग आपण ही निसर्गाची निर्मिती आहोत, आपण ही मीच का ?  हा सवाल विचारू नये, त्यात अडकू नये .....!!काही मिळणारही नाही ....!!! 
         जेव्हा प्रवासाला चालायला सुरुवात केली तेव्हापासूनच दऱ्या-खोऱ्यातल्या चढ-उतारांची, दगड-धोंड्यांची साथ होती, काट्या-कुपाट्या असणाऱ्या पाऊलवाटेवर रक्तबंबाळ झालेल्या पायांनी , माथ्यावर सूर्य आग ओकत असतानाही ईस्पितस्थळापर्यंतच्या प्रवासाचा महोत्सव करण्याचा निर्धार केलाय..
           यात माहीत नसतं  मुक्कामाचा थांबा कधी येणारय,अन् नंतर हळहळ व्यक्त करायला संधी नसावी म्हणून या प्रवासाचाही महोत्सव करत रमतगमत चालायचं , अनपेक्षित वळणं आलीतर वेगाला आवर घालायचा अन् एक-एक पाऊल टाकत राहायचं....!!
       यात चांगल्या-वाईट गोष्टींच्या पाऊलखुणा, उमटणारच आहेत.....!!
चांगल्या पाऊलखुणा, कोणालातरी प्रेरणा देत राहतील,

वाईट पाऊलखुणा,कोणालातरी शिकवण देत राहतील...!
पण या चांगल्या वाईट पाऊलखुणांचा, गणिताचे नियम वापरून हिशोब लावायचा नसतो , हाती काही लागत नाही.....

      जेव्हा कधी हा दिगंतरापर्यंतचा प्रवास सुरू केला, तेव्हाच कोणाच्या साथीची अपेक्षा नव्हती तरीही प्रवासात भेटलेल्या घनदाट जंगलातल्या अंधाऱ्या पायवाटेवर, काहीकाळ का होईना कवडश्यानीं साथ दिलीय, हेच ऊर्जा देणारं आहे, नवचेतना देणारं असतंय...त्यात समाधान मानावं....!!
         समाधानी जगण्यासाठी कशाचीच आवश्यकता नसतेय, गरज असते ती आपल्यावर असणाऱ्या दृढ विश्वासाची अन् जिद्दीची......!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Monday, March 2, 2020

दुनिया स्वप्नांची....!!!

       Hey hey जिंदगी हा तूच-तूच...तुझ्यापेक्षा सध्या कोण आहे हाक द्यायला...!!
 कशी आहेस न तू...??
        किती ते स्वप्न बघण्यास भाग पाडते....
कितीतरी रंगरंगोटी करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे रंग, रंगपेटीमध्ये आणून ठेवते...!!
      आम्हीही भाबडी माणसं, त्या स्वप्नांच्यामागे जीव ओतून पळतो....!! मनलावून रंग भरतो, का...??, तर माझ्या स्वप्नातला दिवस अगदी रंगेबिरंगी उत्साहित, प्रेरित करणारा असावा...!!
यात तुझा तो काय दोष....!?
      तुझं तू काम केलंस रंग दिले, रंग पेटीही दिली, आत्ता आम्हाला ते रंग कोणत्या पृष्ठभागावर उमटवायचे, ते आमचं-आम्हीचं ठरवलं पाहिजे...!!!
       किती असतो, हा स्वप्नांचा पसारा, किती छान बेत असतात जगण्याचे...!!! आप्तस्वकीयांची, आपली, आपल्या म्हणवणाऱ्या आपल्या लोकांची, भरमसाट स्वप्ने ...!!
         पण ही स्वप्ने सत्यात उतरवण्याची धमकही असतेच की आपल्याकडे...!
      पण जीवनात कधी-कधी अश्या गोष्टी घडतात की,आपली स्वप्नच स्वप्नांच्या हवाली करून, आपली वाट सोडून, आपल्या माणसांसाठी, काही काळासाठी, आपली स्वप्ने बाजूला ठेवावी लागतात ...!!
          पण मग कधी एकांत मिळालाचं तर आयुष्यात आठवणी बनून गेलेली, जीवनरुपी पुस्तकाची पान चाळायला घेतली तर अगदी हरवून गेल्यासारखं होतं..!!
         जीवन जगण्याचे किती छान बेत होते,
         किती तो स्वप्नांचा पसारा...!!!
         कुठंतरी मी जात होतो, तर कुठं नियती घेऊन जात होती..!!
         काय योजलं होतं अन् काय मिळालं?
         कुठं पोहचायचं होतं अन् कुठं येऊन पोहचलोत?
        याचा हिशोब लागता लागत नाही, या विचारांच्या भाऊगर्दीत  अनुभुती येते ती गर्दीतल्या एकांताची....आत्मपरीक्षणाची.... स्वप्नांच्या रंगरंगोटीची...!!
          पण पुन्हा स्वप्नाच्या पाठीमागे नक्की धावू, तेवढी ऊर्जा नक्कीच आहे.नव्या जोमाने कामाला लागू तीच ऊर्जा तीच धमक...!!
         जीवनातल्या थोड्या गोष्टी स्थिरस्थावर झाल्यानंतर स्वप्नांवर तुटून पडून ते नक्कीच वास्तवात आणू एवढी धमक नक्कीच आहे....!!
         हरलोय का जिकलोय हाच प्रश्न ठाण मांडून उभा असतो तो उसंत घ्यायला तयारच नसतो..!!
     अश्यावेळी गरज असते आत्मपरीक्षणाची स्व-ओळख करण्याची...!!
पुन्हा नव्याने रंगपेटीत रंग भरण्याची अन् नव्या जोमाने स्वप्न रंगवण्याची ....!!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...