Friday, April 10, 2020

लग्न, बाप अन् बरंच काही....!!!

आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे हे लग्न...!!
अक्षदारूपी तांदळाचे चार दाणे काय अंगावर पडले की, दोन अनोळखी जीव आयुष्याचे जीवनसाथी होतात....!! काय गजब आहे ना...?
     काय ताकद आहे, बघा या अक्षदांमध्ये....!!
आजही बहुतांश ठिकाणी पोह्यांचा कार्यक्रम म्हणजे पाहण्याचे कार्यक्रम होतात..!
     अन् वयाच्या 23-24 वर्षापर्यंत एकमेकांना ओळखणं तर सोडाच पण पाहिलेलं ही नसतं...!!
     त्या 5-10 मिनिटांच्या संभाषणात इथून पुढचं आयुष्य एकमेकांबरोबर घालवायचं की नाही याचा निर्णय होतो...!!
वडीलधारी माणसं त्यात मूला मुलींना मोठ्यामनाने एकमेकांना बोलण्यासाठी गच्चीवर जाण्यासाठी दिल मोठा करतात...!!
काय विशेष आहे ना....??
     आयुष्याचा महत्वपूर्ण निर्णय बहुतांश ठिकाणी असेच 5-10 मिनिटाच्या ओळखीवर घेतले जातात....!!
     मग बघण्याच्या कार्यक्रमानंतर , एकमेकांच्या होकारांनंतर,असतो तो देवाणघेवाणीचा बाजार....!!
होय बाजारच...!!!
      नवऱ्या मुलाच्या बापाच्या अवाजवी मागण्या,हुंडा वैगरे, त्यात खेदजनक हे असते की नवरा मुलगा कितीही शिकलेला असलातरी आई-बापाच्या शब्दाच्या पुढे जात नाही, याच्या आड सर्व गुपचूप स्वीकारत असतो.
     यात मुलीचा बाप, सर्व मागण्या कमी-जास्त करून मान्य करतो.
का.....??
    तर त्याच्या काळजाच्या तुकड्याचं, लेकीचं आयुष्याचं कल्याण होईल..
     ऐपत नसलीतरी सावकाऱ्याच्या दाराचे उंबरठे झिजवतो,
बँकेच्या कारकूनाला व्यथा सांगत,कर्ज काढतो. पण त्या पोटच्या पोरीच्या कल्याणासाठी, भल्यासाठी त्या नवऱ्याच्या, त्याच्या कुटूंबाच्या अवाजवी मागण्या, अन् त्याची हौस पूर्ण करतो....!!
     सावकाराकडून व्याजाने पैसे आणताना स्वतःला समजावत येतो, याने माझ्या लेकरांचं भलं होणार असेल तर असे कर्ज फेडण्यात आनंद असेल....!!
     या बापाच्या काळजाची कल्पना कोणालाच येत नाही,
आतून प्रत्येक क्षणाला तिळ-तीळ तुटत असतो..!!
     काळजाचा तुकडा आपल्यापासून दुरावणार, हे काळजावर दगड ठेऊन स्वतःलाच समजावत असतो...!!
     बापाची पाहुण्यांमडळींच आदरातिथ्य करण्यात दमछाक होत असते...!पण तो ही दमछाक कोणालाच कळू देत नाही.

कारण अर्धांगिनी जवळ बोलावं, तर ती खचेल,
पोटच्या लेकरांपुढे सांगावी, तर त्यांना त्यांच्या बापाची व्यथा  डोळ्यात  दिसेल...!!
म्हणून मनोमन पोटात ठेवून सर्व कार्य  करत असतो....!!
लग्नाची गोष्टच न्यारी असते हो..!!
       दोन घराचं नातं जोडलं जातं असं म्हणलं जातं
पण खरंच तसं आहे का....??
मुलीच्या बापाकडून फक्त घेतलं जातं, छोट्या-छोट्या भांडयांपासून ते सर्व मोठया गोष्टी ज्या की प्रत्यक्षता मुलाने कधी पाहिलेल्याही नसतात..!
मग का हा एवढा हव्यास, तो ही दुसऱ्यांकडून, मुलीच्या बापाकडून....??
     त्याने त्याचा काळजाचा तुकडाही द्यायचा, हुंडा द्यायचा अन् अवाजवी मागण्याही मान्य करायच्या ..??
तुम्हाला खाण्यासाठी त्याने दिलेल्याचं थाळीत खायची वेळ यावी...!!
तुमची एवढीशीही ऐपत नाही, तुम्ही घेतलेल्या थाळीत जेवण करता येईल.....??
अन् जर नसेल तर तुम्ही लग्न का करावं...??
    हुंड्याच्या बाबतीतही तेच, कपड्याचं तर सोडाच ,
पुढील वर्षभर पुरतील एवढे ड्रेस घेतले जातात.
कोणाकडून.....?? तर ते मुलीच्या बापाकडून....!!
      सुटा-बुटापासून सर्व गोष्टी मुलीचा बाप देणार असेल तर लग्न करण्याचा काय अधिकार....??
याला बाजार नाही म्हणावं तर आणखी काय...??
   एवढं सगळं करूनही त्या मुलीकडून अजाणतेपणी काही चूक झाली, तर त्या बापाच्या नावाचा उद्गार होतो....!!
कीती अजब आहे ना ....?
     एवढं करूनही जेव्हा बापाचा फोन आल्यावर लेकीचा रडका आवाज येतो ना, तेव्हा बापाला धरणी दुभंगल्याचा भास होत असेल....!!
त्या बापाच्या काळजाचा कोणालाच थांगपत्ता नसतो,
ते क्षणा-क्षणाला तुटत असतं...
     एवढं करूनही लेकीच्या आयुष्यात काही कठीण प्रसंग आले, अघटित घडलं, तरीही पाय रोवून न डगमगता, आतून तुटत असलेतरी, मजुबत असल्याचा भास देऊन आधार देत असतात....!
बाप, जो लडखडत असलेल्या लेकराला आधार देत
बोटाला धरून चालायला शिकवतो, बोबड्या बोलाने बोलायला शिकवतो,नव्हे नव्हे जिंदगी देतो...!!
बाप , जो लग्नाची धामधूम झाल्यावर पाठवणीच्या वेळी, लग्नमंडपाच्या कोपऱ्यातल्या खांबाला डोकं टेकवून गंगा-यमुनेला वाट मोकळी करून देतो....
बाप ,जो कणखर आहे, असं म्हणलं जातं,
तोच बाप इतरांची नजर चुकवून डोळ्यातील अश्रुनां रोखण्याचा-पुसण्याचा भाबडा प्रयत्न करत असतो...!!
बाप, जो वेळोवेळी खड्याबोलात दटावलेलं, धमकावलेलं असतं, त्याच्याच मुखातून आज शब्दच फुटत नसतात कंठ दाटून आलेला असतो...!!
फुलपाखरू उडून जाणार हे माहीत असूनही....
ज्या लेकराला तळतावर बसलेल्या फुलपाखराप्रमाणे नाजुकतेनं सभाळलेलं असतं.
त्याच्या पाठवणीचा क्षण म्हणजे किती कठीण असेल
याचं वर्णन करणं महाकठीण....!!
     सर्वांची हौस करतो ती फक्त लेकीच्या सुखासाठी,
कोणापुढे कधीच न झुकणारा बाप लेकीसाठी झुकतोही....!!
हे सर्व लेकीच्या बापाला , लेकीलाच का सहन करावं लागतं..?
तर त्याला आपला समाजाची मानसिकता कारणीभूत आहे 
हुंडा, स्त्रीला दुय्यम स्थान अन् लग्नाच्या अवाजवी मागण्या यावर सुज्ञतेने विचार व्हावा....!!!


#जिंदगी_का_फ़ंडा🍃

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...