Sunday, August 4, 2019

प्रवासातलं जगणं...!!

     आयुष्यातला प्रवास सपंतच नाही हो ...!!
     जन्मापासून सुरू झालेला हा प्रवास , जिंदगी ला फुलस्टॉप भेटल्यावरच काय तो संपतो ....!!
     बालपणातलं स्वतःशीच खेळणं सर्वांना आवडतं, पण जेव्हा मोठे होतो, जबाबदारी येते, तेव्हा स्वतःशी खेळणं अन् पचवणं जिकिरीचं असतं,  कठीण जातं...!!
     नंतर थोडे मोठे झालो तर कुतूहलाने रांगत रांगत जाऊन आई अण्णांच्या (बाबांच्या) पायाला धरून उठण्याचा प्रयत्न करणं, आपल्यासाठी अन् आपलं कौतुक करणाऱ्या हितचिंतकांसाठी आनंदाचा क्षण असतो. पण आत्ता प्रवासात चालताना कुठं धडपडल्यासारखं झालं तरी आई बाबांना खुशालीत आहे हे पटवून देण्यात आंनद वाटतो ...!!
    आणखी वर्ष-सहा महिन्यांचं झाल्यावर आधार घेऊन उठून, छुण-छुण घातलेल्या पायांनी पहिलं पाऊल टाकताना,आण्णा-आईने वाजवलेल्या टाळ्या अन् चेहऱ्यावर ओथंमबुन वाहणारा आनंद आज ही हर्षभरीत करून जातो. पण आत्ता प्रवासात आधार घ्यावा वाटत नाही आधार व्हावा वाटतो , त्यांतच आनंद वाटतो...!!
     या प्रवासात वाट चालत असताना अडखळत , बोबडयाने टाकलेला पहिला शब्द ऐकताना घर अगदी आनंदाने नाहून निघालं असेल ....!! पण आज अडखळत बोललं तर आई बाबांना कळेल "कुछ तो हुवा है".....त्यामुळे मजेत बोललं जातं..
बालपणी चे दिवसचं भारी होते ते ....!!
     पण जीवनातला प्रवास संपत नाही हे तितकंच खरं...!!
शिक्षणासाठी आई बाबांच्या कुशीतली ऊब सोडावी लागली , घर, घरासमोरील अंगण सोडावं लागलं, गावातली गल्ली अन् गाव सोडावं लागलं, मित्र मंडळी,जाता येता आजी-आजोबांच्या तब्बेतीची चौकशी केल्याने निर्माण झालेलं, एक जिव्हाळ्याचं नातं , हे सगळं-सगळं विसरून जड पावलाने अन् तितक्याच जड अंतःकरणाने,भरल्या डोळ्याने, एका नव्या प्रवासाला सुरवात झालेली आजही डोळ्यासमोर तरळते, आत्ता प्रत्येकवेळी घरी जाताना आई-अण्णांबरोबरच , अंगण अन् गावातली गल्ली आतुरतेने वाट पाहते ...!!
     शिक्षण झाल्यावर कामानिमित्त हॉस्टेल ही सुटलं जातं
याच हॉस्टेलने खूप गोष्टी शिकवल्या , खूप आठवणी दिल्या.
आयुष्याच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा या हॉस्टेलचा आहे
घरापासून दूर असल्यावर हेच हॉस्टेल आपलं घर मानायचं
अन् सुरवातीचे काही दिवस बळेच घालवायचे...!!
अन् तेच हॉस्टेल सोडताना, जेवढं घर सोडताना वाईट वाटलं  तेवढंच हॉस्टेल ची रूम सोडताना अन् शेवटच कुलूप लॉक करताना वाईट अन् डोळ्यात थेंब तरळून गेले..!!
पण त्या हॉस्टेल ने खूप आठवणी दिल्या....!!
     शिक्षणाच्या काळात युनिव्हर्सिटी मध्ये खूप चांगले मित्र मैत्रिणी  झाल्या. जीवनात कधी वाटलं ही नव्हतं एवढे जीवाला जीव देणारे मित्र होतील ....आज काही कारणास्तव त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कमी झाला असलातरी ते विसमूर्तित जाणं शक्य नाही...!
प्रवास काटत असताना काही गोष्टी सुटल्या जातात, सोडव्या लागतात...पण त्या कधी विसमूर्तित जात नसतात ...!!
    अश्या या प्रवासाचा हव्यास पांथस्त्याला सुटत नाही.
अनंत अडचणीतून मार्ग काढत, करावा प्रवास आनंदात
...! स्वतःबरोबर इतरांनाही करावी वाटप आनंदाची अन् याच प्रवासाचा महोत्सव करता यावा, महोत्सव व्हावा .....!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...