कधी कधी
तुमच्या दोन चांगल्या शब्दांनी काही चांगलं होणार असेल,
तर ते बोलायचे असतात,
कधी कधी,
वाईट बोलल्याने काही चांगलं होणार असेल,
तर वाईट बोलायचं असतं,
कधी कधी
मनात खूप काही असताना,
काहीच नसल्याचा आव आणायचा असतो,
कधी कधी
काही चांगलं होणार असेल तर,
भळभळणारी आपली जखम लपवायची असते,
कधी कधी
तुमच्या "नाही" ने काही चांगलं होणार असेल,
तर 'हो' असताना ही 'नाही' म्हणायचं असतं,
कधी कधी
काही चांगलंच होणार असेल
तर जसे आपण नसतो, तसेच आहोत अस भासवायचं असतं,
कधी कधी
काही चांगलं होण्यासाठी,
स्वतःला वाईट म्हणूवून घ्यायचं असतं,
आज नाही पण उद्याच्या उज्वलतेसाठी आज स्वतःला जाळायच असतं,
कधी कधी
काही चांगलं घडणार असेल तर 'स्व' बाजूला ठेवायचा असतो,
कधी कधी
एकरूप पाण्याच्या प्रवाहाचा आपण दुभाजक बनत असेल,
तर नकळत स्वतः बाजूला व्हायचं असतं,
कधी कधी
लडखडणाऱ्या पायांना हात द्यायचा नसतो,
त्यांना त्यांच्याच पायावर उभं राहू द्यायचं असतं,
कधी कधी
काही चांगलं होणार असेल,
तर प्रवाहाच्या उलट दिशेने चालायचं असतं,
जखमा होणार असल्या तरीही....!!
#जगणं❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃