Wednesday, October 7, 2020

एक सायंकाळ..!!

एक सायंकाळ अशीही व्हावी,
विचारांचं काहूर शांत व्हावं,
मनी उठलेली वादळं क्षणात नाहीसं व्हावीत,
सलणारे काटे निखळून पडावेत,
त्या जखमा भरून निघाव्यात..!!

एक सायंकाळ अशीही व्हावी,
आजूबाजूच्या गोंगाटाचं भान विसरावं,
स्वतःच्या स्वतःमध्येच शांत बसावं...!!
ना कसल्या महत्वकांक्षा असाव्यात
ना कसला हेवा असावा...!

ना विजयाच्या आंनदाची पताका दिसावी,
ना पराजयाचं पांढरं वस्त्र उंचावलेलं दिसावं...!!

एक सायंकाळ अशीही व्हावी,
एकच गोंगाट होऊन धावपळीची चाहूल लागावी,
टी-टी-टी वाजणारं मशीन झोपी जावं,
राहिलेला शेवटचा दीर्घ श्वास सुटावा,
शांत....शांत......अन्....शां.....त..!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃




2 comments:

  1. मावळतीचं तेज जाणवणाऱ्या मनाला सायंकाळचा शेवट नसतोच..नसावा!
    Keep Writing!

    ReplyDelete

अटळ 'अर्जुन'तम...!!

  प्रत्येकाची स्वतंत्र ही लढाई, कधी कृष्ण, कधी अर्जुन तर कधी बनून कर्ण करायची उतराई...!! चूक बरोबर , चांगलं वाईट, याच्या परिसीमा व्यक्तीगणिक...