Friday, October 16, 2020

व्यथा बळीराजाची...!!

कशी सांगू शेतकऱ्याची व्यथा,
पीक कधी ओल्याने तर कधी कोरड्या दुष्काळाने नेलं,
कधी  हमीभावाने तर कधी व्यापाऱ्याने भावात लुटलं,
हाता तोंडाला आलेला घास,
पावसाने हिरावून नेला...!!

दिवाळीला लेकराला नवी कापडं घ्यायची होती,
कारभारणीला लय दिसातून एक साडी घ्यायची होती,
त्याची चप्पल तर पार झिजली होती,
कपडे ठिगळं लावून लावून शिवली होती..

आवनदा पाऊस ठीक होता, पीक पण जोमात होतं,
कष्टाचं चीज होणार होतं,
पण आभाळ कोसळलं,
होत्याचं नव्हतं झालं,
ज्याने दिलं त्यानेच नेलं,
शेतकरयाचं स्वप्न डोळ्यातून टपकलं.
खचू नको रे शेतकऱ्याच्या पोरा 

एक दिस तुझाही येईल,
दुरून पाहणारी माणसं नतमस्तक होतील....!!

#शेतकरी_वाचवा
#अतिवृष्टी
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

No comments:

Post a Comment

जगण्याचं ऋतुचक्र...!!!

  होता पानगळीचा हंगाम माझा, चैत्राची पालवी मागून गेलीस..!! कळीच्या उमलण्याच्या मुहर्तास, फुलांचा ध्यास घेऊन आलीस...!! जेव्हा फुलं ही उमलली, ...