Tuesday, September 29, 2020

आता तुला थांबलं पाहिजे....!!

आता तुला थांबलं पाहिजे,
खूप संसार उध्वस्त झाले म्हणून थांबलं पाहिजे
कोणी कर्ता गमावला, कोणी पोटचा गमावला,
तर कोणी जन्मदातीला पारखा झाला,
खूप झाला तांडव आता घेऊ दे थोडा श्वास मोकळा.
खुप संसार मोडून पडले, बेचिराख झाले,
आदिलशाही-मोघलशाहित घरं पेटवली होती,
गाढवाचा नांगर फिरवला होता.
आता तू चालती बोलती माणसं पेटवतोय रे,
स्मशानात गर्दी झालीय रे...!!
म्हणून तुला थांबलं पाहिजे.
न्यायचंच असेल तर गोरगरिबांचा पैसा लाटणारे भ्रष्ट राजकारणी घेऊन जा.
न्यायचंच असेल तर गरिबांच्या योजना हडप करणाऱ्या अधिकाऱ्यांना घेऊन जा.
न्यायचंच असेल तर आया-बहिणीचीं इज्जतीला हात लावणाऱ्या विकृतींना घेऊन जा.
न्यायचंच असेल तर दुषप्रवृत्तींना घेऊन जा.

#कोरोना
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

No comments:

Post a Comment

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला...!!!

होळी सरून आता उन्हानीं चांगलाच ताव धरला होता, त्यातच निसर्गाने पानगळीचा हंगाम चालू केलेला. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेली काही काळाची हिरवळ आ...