Tuesday, September 22, 2020

लॉकडाउन:-एक अकल्पनिय काळ...!!


     आज लॉकडाऊनला सहा महिने पूर्ण झाले,दरम्यानच्या काळात खूप गोष्टी बदलल्या, सर्वांना खडबडून जागं केलं...!!
     डॉ.कलामसरांनी दाखवलेलं 2020 चं महासत्ता होण्याचं स्वप्न आणि प्रत्यक्षात 2020 चा भारत याची तुलना होणं महाकठीण..!!
     सर्वच बाबतीत आपण कुठे आहोत..? काय केलं पाहिजे.? काय अनावश्यक आहे ..? काय आवश्यक आहे..? याचं अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करणं खूप आवश्यक आहे.
     असणाऱ्या हॉस्पिटलची वाताहात, जिल्हास्तरावरसुद्धा सुसज्ज हॉस्पिटल नसणं, आपल्यातला शिस्तबद्धपणा अन् कुठे राजकारण करावं याची जाण.
     या कठीण काळात माणसं माणसांशी कसे वागले कसं वागायला हवं, लॉक करताना तळागाळातील सर्व समाजाचा किती विचार केला..?, काय उपाययोजना करायला हव्या होत्या..? आणि असे प्रसंग पुन्हा उद्भवू नये यासाठी काय करता येईल.?, उद्भवलेचं तर आपण किती सज्ज असायला हवं...?  यासाठी आजपासून सुरवात करणं गरजेचं आहे..!
या कठीण काळाने काय शिकवण दिली हे जरी शिकता आलं तरी खूप झालं..
     यात गोरगरीब तसेच मध्यमवर्गीय समाजाची झालेली वाताहात , मन हेलावून टाकणाऱ्या गोष्टी होत राहिल्या..!      
     शिक्षण व्यवस्थेतील करावे लागणारे बदल, पुतळे प्रेरणा देण्याचं काम करतात मान्य, पण त्याच महापुरुषांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल , ग्रंथालये उभी राहिली तर काही सकारात्मक होईल का...? याचा विचार करणं गरजेचं, आणि हा विचार स्वतः करणं आवश्यक आहे.
स्वतःपासून स्वतःच्या घरापासून विचार करणं आवश्यक आहे..!    
     भारतातील एक सुज्ञ नागरिक, सत्ताधारी-राजकारणी आरोग्य यंत्रणा,समाज माध्यम, प्रशासन या सर्वांसाठीच हा आत्मपरीक्षण करण्याचा काळ, एक wakeup कॉल होता, आहे...!!
सर्व लवकर पूर्वरत व्हावं, समृद्धी यावी, मंगल व्हावं सुंदरतेने जग पुन्हा बहरावं...!!💐

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

No comments:

Post a Comment

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...