संथ येणारा 'तो' शांतपणेच निरोप घेतो.
ना कसला आततायीपणा, ना कसली घाई.
रणरणत्या उन्हात वाट 'ती' पाहते,
पण अश्रू मात्र 'तो' ढाळतो.
याचं क्षणात मोर अंगणी नाचतो,
वारा हिरव्या पानांसंग गीत गातो,
नभी लपंडावाचा खेळ रंगतो,
अन् मग इंद्रधनू फुलू लागतो.
तेव्हाचं निरोपाचा क्षण येतो,
जसा आला 'तो' तसाच शांत-संथ निरोप घेतो.
ना कोणती वचनं, ना कोणत्या आणाभाका.
तरीही अचूक वेळा 'तो' पाळतो,
तरीही रणरणत्या उन्हात वाट 'ती' पाहते.
बदलत मात्र कोणीच नाही,
ना तिला आहे उंच होण्याची आशा,
ना त्याला आहे त्या उंचीचा अभिमान.
ना 'ती' बदलली ना 'तो'.
ना कसली बंधनं, ना कसली वचनं,
म्हणूनच जमतं त्यांना फुलत राहणं,बहरत राहणं...!!
#सांजवेळचा_पाऊस
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
No comments:
Post a Comment