मनुष्य म्हणजे भल्यामोठ्या विश्वाच्या पसाऱ्यातील छोट्याश्या ग्रहावरील; आळवाच्या पानावरील, पाण्याचा थेंब.....!! सूर्याच्या किरणांमुळे काहीकाळ लकाकणारा, सोनेरी दिसणारा,..!! पण कितीकाळ सोनेरी..? अन् कितीवेळ अस्तित्व..?? याची कल्पना नसलेला जीव ....!! यात शब्दरूपी #जिंदगी_का_फ़ंडा�� चिरकाल राहील राहावा एवढीच भाबडी आशा.......!! 【काही चुकीचं वाटलं तर खुल्या मनाने आवश्य सांगा.. तुमचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी अमूल्य आहे..आणि हेच शब्द लिहिण्यास प्रेरणा देतील】
Thursday, August 15, 2024
'ती'च्या पल्याडची ती....!!
ती अन् तो....!!
Sunday, August 4, 2024
पाऊस, जगणं अन् उमलणं....!!
नुकतच रांगायला लागलेल्या
बाळासारखा अंगाखांद्यावर
अंगणात खेळणारा...
पायातल्या छुणछुण आवजासम
संततधार सरींचा
कानात नाद घुमणारा...
पाऊस,
कित्येक दिवसांच्या
'ति'च्या विरहाच्या
प्रश्नांचं उत्तर हलकेच देणारा...
कित्येक दिवसांचा आकस
काही क्षणात वाहून नेणारा...
पाऊस,
पानांवरून घरंगळताना
'ति'च्या गालावरच्या निखळ खळीची
आठवण देणारा...!!
काहीकाळ खळीतच
मन गुंतवणारा...!!
पाऊस,
जुन्या मित्रांबरोबरच्या
चहाच्या टपरीवरच्या
हास्य लहरींमधल्या
जुन्या आठवणींचा
वाफाळता चटका देणारा...!!
सिगारच्या धुराबरोबर
आठवणी हवेत धूसर करणारा...!!
पाऊस,
जुन्या-नव्या आठवणींच्या
सरितेवरचा साकव तो जोडणारा...!!
त्याच साकवावर
चिंब केलेल्या
पावसाबरोबर
पापण्या
ओलावणारा...!!
#पाऊस❣️
#जिंदगी_का_फंडा🍃
एकांत...!!
Sunday, July 21, 2024
आयुष्य हे...!!
शब्दही मुके जाहले,
जरी भावनांना पेव फुटले...
चालणाऱ्या पायांनीही
प्रश्न करणं आता सोडलं,
उगवणाऱ्या दिसाबरोबर
चालणंच हे जीवन मानलं...
मावळणाऱ्याचं तर आता
भेटच नको जाहली,
असंख्य हिशोबांची डायरी
आता कोनाड्यात पडली...
उगवला-मावळला की
आयुष्याची गणती होते,
धावणाऱ्यास मात्र
याची कल्पना न होते...
धाव-धाव धावत
दमछाक कधी होते,
पण घाम पुसून
पुन्हा धावण्यात
स्पर्धा अपुरी पडते...
कधीतरी केव्हातरी
पेला हा भरतोच
ओसंडून वाहण्यास
काहीच अवकाश होतो...
तेव्हा किती धावलो
याचा हिशोब काही
लागत नाही,
कितीही धावलो तरी
जगण्याची
कस्तुरी काही सापडत नाही...
मग अशीच
एक संध्याकाळ होते,
तिरप्या किरणांनी
सुरकुतल्या पायास स्पर्शून जाते..
तेव्हा मात्र ओलावणाऱ्या
पापण्या किरणांना अंधुक करतात,
हा , हा म्हणता-म्हणता,
सर्वांग त्या सांजेच्या किरणांनी
व्यापून टाकतात..
अनंत काळासाठी ....
काही वाईट, काही चांगल्या
पाऊलखुणा मात्र मागं सोडतात ....!!!
#आयुष्य_हे❣️
#जिंदगी_का_फंडा🍃
Wednesday, July 17, 2024
तत्व अन् बरंच काही....!!
तत्वनिष्ठता ही भाजीपाल्यासम कुठंही मिळणारी संजीवनी नाही. यासाठी कित्येक त्याग, अनुभव अन् आपण ज्यांना आदर्श मानतो यांच्या वाचनातून, त्या वाचलेल्या आदर्शवत कृतींच्या अनुभूतीतून अन् तपश्चर्येतून येते. पण त्याची व्याप्ती मातीच्या कणापेक्षाही लहान आपणाला उमजली जाते ...या काही अक्षरांची ताकद कळायला अन् अजमवायला कित्येक अनुभूतीतून तरल राहून स्वतःच्या परे जाऊन चुकीला स्वीकारून बरोबर गोष्टींची सक्षम बाजू मांडून्याचं धारिष्ट खूप कमींकडे असतं... अर्थात, तत्त्वनिष्ठता ही एक ज्वाला आहे, जपली तर अनंतकाळासाठी कालातीत राहणारी अवघा आपला आसमंत रंगवून टाकणारी नाहीतर काही भौतिक अन् नश्वर लालसेपोटी वेशीवर टांगून, त्याचं ज्वालेची भस्मात जळून गेलेली तत्त्व अन् निष्ठा पाहूनही खेद नसणारी मंडळी भाळी ल्यायतात अन् आविर्भावातच जगणं रेटतात. यात उरली सुरली माणसं मात्र जिकिरीने प्रकाशाचा धर्म सांभाळतात, हे इतरांना हेकट, त्रासदायक अन् न पटणारी बनु शकतात यावर कितीही विश्वास न बसण्यासारखे असलं तरी तथ्य आहेच.... एव्हाना कधी कधी आपल्याच तत्वनिष्ठपणाचा, बाणेदारपणाचा कस लागतो. हे सगळं सोडून देऊन वाहत्या गंगेबरोबर, असंख्य माणसांच्या गर्दी बरोबर जाऊन त्या गर्दीचं व्हावं की काय असं होतं, बंडखोर वृत्ती उफाळून येते... पण तेव्हाच वेगळंपण जपण्याचा वसा घेऊन सद्सद्विवेक बुद्धी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायचं काम करत असते अन् कोलमडणारा रथ पूर्वरत होतो...
यात स्वतःला सांभाळणे अन् त्या काही अक्षरांसाठी जगणं हे ही एक तत्वचं... अश्या स्वभावाच्या माणसांना दुनियादारीत एकरूप होणं महाकाठिण्य असतं...
कारण जे पोटात तेच ओठावर आणण्याचं धारिष्ट ठेवणारी मंडळी हेकट म्हणून नाकारली जातात नाहीतर काही लेबलं लावून दूर फेकली जातात....
समाजात अशी माणसं एकाकी पडतातही पण याच वृत्तीमुळे जो जगण्यातला बाणेदार पणा आयुष्याच्या सोबतीला सावली प्रमाणे जपतात अन् निरोप घेऊन जातानाही काही चांगल्या पाऊल खुणा ठळक अनंत काळासाठी सोडून जातात....
भौतिक लालसेपोटी सांभाळलेल्या तत्वांना तिलांजली काही क्षणात दिली जाऊ शकते पण तीच तत्व अन् निष्ठा स्वीकारायला अन् अंगिकारायला हत्तीच बळ यावं लागतं क्षणोक्षणी आपल्या आदर्शांच स्मरण असावं लागतं
सभोवतालचं वातावरण आपल्याला त्याच्यानुसार बनायला भाग पाडतंही.... अश्यावेळी आपलं स्वतःचं वयल जपताना दमछाक होते, पण तीच दमछाक सकाात्मकतेचा सुंदर डाग देऊन जाते
गर्दीचं व्हायचं नाही. हे पुन्हा-पुन्हा सांगत राहते.....
जगाला हेकट वाटणारी, बहुतांश वेळा न पटणारी ही वृत्ती त्याग मागत असते बलिदान मागत असते ..... जी माणसं बलिदान देतात ती अनंत काळात जिवंत राहतात.....!!!
#तत्त्व_अन्_निष्ठा #जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃
प्रवाह जगण्याचा....!!
Wednesday, June 5, 2024
पाऊस, जगणं अन् बरंच काही....!!
आताश्या कामात दंग असणारं मन पाऊसात भिजून एकरूप होत नाही. खूपच वाटलं तर पाठीशी एका हातावर दुसऱ्या हाताची घट्ट मूठ बांधून किंवा खिडकीत उभं राहून, दुरूनच पाऊस पहिला जातो... अनुभवला जातो. हाताची पाठीशी बांधलेली घट्ट मूठच, सगळं नकळत सांगून जातेय.. यात मनाची घालमेल, मिळवलं-गमवल्याचा हिशोब, दुरावलेल्या गोष्टी, हुलकावणी देऊन गेलेले असंख्य क्षण, चुकलेल्या निर्णयापासून दुखावलेलं मन तर बरोबर निर्णयांमुळे खुश होणारं मन , सलणारे काटे, झालेल्या असंख्य जखमा, कधीच कोणालाच सांगू न शकणारं, आपल्याबरोबरचं, या जगाचा कायमचा निरोप घेणारं जगण्याच्या प्रवासातलं एखादं (एखादं ...??असंख्य) रहस्य असं कित्येक गोष्टी त्या मुठीत घट्ट पकडुन ठेवलेल्या असतात.... कोणासही दिसू नये ती घट्ट पकड म्हणून पाठीशी बांधून ठेवत असू कदाचित....
पण खिडकीतून कोसळणारा हा पाऊस ही पकड सैल करू पाहतो.... कोसळणाऱ्या त्या सरींबरोबर आपल्यालाही वाहत जाण्यास उद्विक्त करू पाहतो...
वाऱ्यास सोबती घेऊन खिडकीतल्या पारिजातकाच्या झाडाबरोबर लपंडावाचा खेळ मांडून, त्याच्या इवलुश्या नाजूक फुलांचा अंगणात सडा टाकून, मनाला सुगंधाची भुरळ पाडू पाहतो....
कोसळणाऱ्या या सरी अन् हा अल्लड, अवखळपणे बिनदिक्कत मुक्त संचार करणारा वारा दूर कुठेतरी आठवणींच्या गावा घेऊन जातो....
कधीकाळी रेखाटलेली, आपलीच कल्पनेतील पावसाळी दिवसांची चित्रफीत डोळ्यांसमोर उभी करतो... कोसळणाऱ्या प्रत्येक सरींचा नवा अध्याय लिहितो.... झाडाच्या पानावरून घरंगळत येणारा हा पावसाचा थेंब काही वेगळाच भासतो....हा-हा म्हणता मातीत एकरूप होतो...
कसं जमवतो हा....??? याच कोड्यात आपलं मन गुंतून जातं.
पडणाऱ्या पावसाच्या सरी आता खोल मनाच्या बंद खोलीत डोकावून पाहतो... कित्येक दिवसांच्या जळमटांनी आच्छादलेेली, सुंदर क्षणांची चकचकीत भरजरी कापडात गुंडाळलेली कुपी लखलखीत करतो.
फुलं तोडण्याच्या झटापटीत झालेल्या जखमांवर हलकेच फुंकर घालून, सलणाऱ्या- रुतणाऱ्या काट्यांना दूर करत पाठीशी बांधलेली मूठ सैल करतो...
तेंव्हाच मनी रंगवलेली,हरवलेल्या क्षणांची, दुरावलेल्या किंवा दूर लोटलेल्या गोष्टींची, पावसाळी दिवसातली, गुलाबी रंगाची कोपऱ्यात धूळ खात पडलेली कूपी पाहून हलकेच पापणी ओली होते ...
दूर अनोख्या प्रदेशात घेऊन जाते....
कित्येक क्षणांचा हिशोब न ठेवता मनाला, आभाळात पाऊस पडुन गेल्यावर मुक्त संचार करणाऱ्या पक्ष्यासम जमिनीचा विसर पडुन वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते....
तेंव्हाच वाऱ्याबरोबर खिडकीतून येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे जाग येते....ऑफिसातल्या कारकुनाने खोली बंद करण्यासाठी कुलुप हाती घेतल्याचा नाद होतो .... कल्पनेतल्या मनाला वास्तविक मन हाक देतं....
जणू खिडकीतून येणारा हा गार वारा सांगून जातो, कितीही सुंदर असले क्षण तरी कधीतरी सोडून द्यावेच लागतात ...
कल्पनेतलं जग विलोभनीय असतंच पण जगण्याच्या भागदौडी मध्ये ते मागं सुटलं जातं.... कितीही सुंदर असलं तरीही पावसाच्या सरींसम कधीतरी मातीत झोकून द्यावं लागतं विसरून स्वतःला एकरूप व्हावं लागतं..... जसं
दाटून आलेल्या आभाळानं आता कोसळनं पसंद केलं,
तसं मोलाच्या क्षणानांही मातीत मिसळनं
आता नित्याचाच होऊन गेलं.....
#पाऊस❣️ #जगणं
#जिंदगी_का_फंडा🍃
Monday, June 3, 2024
दुनियादारी....
स्वार्थाची लक्तरे घेऊन जन्माला आलेली नाती कितीही ठिगळं लावली तरी फटकीच असतात...स्वार्थापोटी लावलेली हीच ठिगळं कधीनाकधी खऱ्या चेहऱ्यानिशी उघडी पडतात...!!
#दुनियादारी❣️
#जिंदगी_का_फंडा🍃
Tuesday, May 21, 2024
तिन्हीसांजा.....!!!
सर्द भिजलेला....!!!
ऑफिस सुटल्यानंतर धावत जाऊन त्याने बस पकडली. पावसाळा सुरू व्हायला अजुन तसा अवकाश होता पण त्यागोदरच्याच वळवाच्या पावसाने चांगलाच जोर धरला होता...

-
"देखो मगर प्यार से" ट्रक च्या पाठिमागे लिहिलेलं हे तीन शब्द जीवनाविषयीच तत्वज्ञान सांगून जातात...!! फुलांनी बहरलेल्या ब...
-
हेच आग विझवणा रं पाणी, दुष्काळात कधी पेट घेतं हे कळतंच नाही ....!! 'पाणी जपून वापरा' हे वाक्य आम्हांला नवीन नाही माय...
-
सांजवेळी बसावं असंच गावातील उंच टेकडीवर,.. !!अश्या जागेवर की जिथुन दिसेल सगळं गाव , गावात येणारी धुळीची वाट , आपलं घर , आपलं अंगण...
-
चल गड्या, आता पसारा आवरायला घेऊ, माळ्यावरच्या गोष्टींची थोडी निवड करू, थोडं तुझं, थोडं माझं समजून घेऊ, अडगळीवरची धूळ थोडी साफ करू..!! आपलं, ...
-
दिवसभराच्या धावपळीने थकलेलं शरीर बेड वर पडताच झोपी गेलं होतं. पावसाळा सुरू होऊन दहा-एक दिवस उलटून गेले होते, पण अजूनतरी म्हणावा असा पा...
-
मागील वर्षी पाऊस नसल्यामुळे, यावर्षी धरतीवरचे सर्वच जीव-जंतू , झाडे-वेली, पावसाची खूप आतुरतेने वाट पाहत होते...!! अन् काही ओळी स...
-
एके दिवशी मेट्रो सिटी असणाऱ्या पुण्याच्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जे एम रोडवरून फिरत असताना , एक 8-9 वर्षाचा मुलगा अंगावर मळलेले क...
-
काही ठिकाणी गेल्यावर तुम्ही स्वतः हरवता त्या सुंदर विश्वात ....!! तुम्ही स्वतःच स्वतःचे होऊन जाता; अन् माणूस जेव्हा स्वतःला...
-
एखाद्या संध्याकाळी स्मशानातून एक फेरी मारून तर पहा काय दिसेल....!! ऐशोआरामी अगदी श्रीमंतीत जन्मलेला आणि गरीबीत हालाकीत...
-
प्रवासी या वाटेवरचा, अनेक चुकांच्या साक्षीला, 'तू' कायम सोबतीला, मी मात्र साक्षीदार माफीचा..!! अल्लडपणात धूळ उडवली, अगदी अस्पष्ट मू...