Sunday, July 21, 2024

आयुष्य हे...!!

 

शब्दही मुके जाहले,

जरी भावनांना पेव फुटले...


चालणाऱ्या पायांनीही 

प्रश्न करणं आता सोडलं,

उगवणाऱ्या दिसाबरोबर 

चालणंच हे जीवन मानलं...


मावळणाऱ्याचं तर आता 

भेटच नको जाहली,

असंख्य हिशोबांची डायरी

आता कोनाड्यात पडली... 


उगवला-मावळला की

आयुष्याची गणती होते,

धावणाऱ्यास मात्र 

याची कल्पना न होते...


धाव-धाव धावत

दमछाक कधी होते,

पण घाम पुसून 

पुन्हा धावण्यात 

स्पर्धा अपुरी पडते...


कधीतरी केव्हातरी

पेला हा भरतोच 

ओसंडून वाहण्यास

काहीच अवकाश होतो...


तेव्हा किती धावलो

याचा हिशोब काही 

लागत नाही,

कितीही धावलो तरी

जगण्याची

कस्तुरी काही सापडत नाही...


मग अशीच

एक संध्याकाळ होते,

तिरप्या किरणांनी 

सुरकुतल्या पायास स्पर्शून जाते..


तेव्हा मात्र ओलावणाऱ्या 

पापण्या किरणांना अंधुक करतात,

हा , हा म्हणता-म्हणता,

सर्वांग त्या सांजेच्या किरणांनी

व्यापून टाकतात..

 अनंत काळासाठी ....

काही वाईट, काही चांगल्या

 पाऊलखुणा मात्र मागं सोडतात ....!!!


#आयुष्य_हे❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

No comments:

Post a Comment

अटळ 'अर्जुन'तम...!!

  प्रत्येकाची स्वतंत्र ही लढाई, कधी कृष्ण, कधी अर्जुन तर कधी बनून कर्ण करायची उतराई...!! चूक बरोबर , चांगलं वाईट, याच्या परिसीमा व्यक्तीगणिक...