वाटेत माझिया
सह्याद्रीची
आडवाट नक्कीच यावी,
त्याचबरोबर कणखरता
मात्र रक्तात भिनावी....
चालताना पायात माझिया
स्वार्थाची लक्तरे जरी गुंतली
तर तेव्हा निस्वार्थीपणाची
फुलं मात्र पेरायास जमावी..!!
जेव्हा बोचऱ्या शब्दांची
लाखोळी वाहिली जाईल,
तेव्हा शब्दांनी माझिया
सुमने उधळण्याची न टाळावी...
थकलेल्या मनाला
क्षिनलेल्या डोळ्यांना,
शब्दांनी माझिया
नवचैतन्याचं दान मिळावं...
नैराश्येच्या वाटेवर
आशेची फुलं दिसावी
तीच चांगुल्याची फुलं
वेचली जावी,
वेचलेल्या या सुगंधाची
मांदियाळी नक्की व्हावी,
भरलेल्या सुगंधाच्या बाजारात
ही फुलं मात्र मुक्ततेने उधळावी ...
ही फुलं वेचताना
जखमाही देतील,
त्याच जखमांच्या कहाण्या
वाटेच्या शेवटाला
चवीने सांगितल्या जातील....
वाटेवरचा सुर्य आता
अस्ताचलास निघेल,
निरोपाची घटका
समीप आणेल...
वाट आता अंधारून जाईल,
थरथरणाऱ्या हाताला,
चाचपडणाऱ्या हाताला,
आधाराची काठी व्हावी...
शब्दांनीच शब्दांची
जखम भरावी,
सांत्वनाच्या शब्दांनी
आयुष्याची सांगता व्हावी...
शब्दांची सुमने उधळताना
तिन्हीसांजेची
काळसर छटा मात्र न दिसावी...!!
#जगणं ❣️
#जिंदगी_का_फंडा🍃
No comments:
Post a Comment