Thursday, March 21, 2024

तू सांजवेळची कविता...!!

 

दिवस संपून जातो,

तरी बाकी काहीतरी उरतेच,

उगवत्या बरोबर केलेली

खूणगाठ कुठंतरी सुटतेच....!!

कुठं सुटली म्हणून 

मन मात्र लढत राहतं,

एक मन दुसऱ्या मनाशी

वाद घालत राहतं...!!


अश्यातच दाराशी सांजवेळ 

टेकते,

तिरप्या किरणांनी 

अभिषेक घालते....!!


सांजवेळ झाली की 

त्याला 'तुझी' आठवण येते,

मग 'तु' त्यास सामावून घेते...

अन् बंद कुपितल्या मनाला

हलकेच फुंकर घालते...!!

सांजवेळी तुझी 

उणीव कधी ना भासावी

सांजवेळी कायम सोबती 'तू' असावी...!!


#तू_सांजवेळची_कविता❣️

#जागतिक_कविता_दिवस #world_poetry_day 😍

#जिंदगी_का_फंडा🍃

2 comments:

अटळ 'अर्जुन'तम...!!

  प्रत्येकाची स्वतंत्र ही लढाई, कधी कृष्ण, कधी अर्जुन तर कधी बनून कर्ण करायची उतराई...!! चूक बरोबर , चांगलं वाईट, याच्या परिसीमा व्यक्तीगणिक...