तुझं जाताना ते वळून पाहणं,
खूप काही सांगून गेलं,
अमावस्येचं चांदणं,
धरतीवर अवतरलं,
शेवटचेचं तुझे ते शब्द,
संपूच नये वाटत गेले,
ही वेळ इथंच थांबावी,
घड्याळ्याचे काटे सरुच नये वाटत गेले,
हातातून हात सुटताना ,
खूप झाल्या वेदना,
सर्व वैभवच घेऊन गेली जाताना,
देऊन शब्द कवितांना,
तू गेली पण आता,
दारातला गुलमोहर नाही बहरत पहिल्यासारखा,
दरवळ त्या बकुळाचा,
नाही भुलवत पहिल्यासारखा,
जिथं झाल्या असंख्य गप्पा,
तो बेंच आता वाकुल्या दाखवतो,
एवढं फुललं असताना,
ओसाड माळरानच तिथं भासतो,
सहज जावं फेरीला,
तर अजूनच वावटळ उठत गेला,
प्रत्येक कणात,
प्रत्येक क्षण आठवणीत कोरत गेला,
वाटलं दूर जावं कुठंतरी,
पण कसं दूर जाऊ,
मी माझ्याच पासुनी,
म्हणून मी भटकत राहिलो,
कल्पनेच्या रंगात नाहून निघालो,
#काल्पनिक_ती❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Bharich sirji...
ReplyDeleteWell done..🤘
Thank you
ReplyDelete