होता पानगळीचा हंगाम माझा,
चैत्राची पालवी मागून गेलीस..!!
कळीच्या उमलण्याच्या मुहर्तास,
फुलांचा ध्यास घेऊन आलीस...!!
जेव्हा फुलं ही उमलली,
तेव्हा तुच त्यास अल्पायुषी म्हणून गेली...!!
जेव्हा कडाक्याच्या उन्हात,
पाऊस नसण्याची
जाणीव मात्र दिलीस...
तेव्हा कुडकडणाऱ्या थंडीत मात्र
उन्ह नाही म्हणून
कायमची सावली हिरावून गेलीस...!!
सखे,
तूज ठाऊक न सर्व...
प्रत्येक हंगामाचा
काही काळ हा असतो ठरलेला...!!
आज उन्हांचा,
तर उद्या सावलीचा खेळ हा
मांडलेला...!!
तव
न विसरावा खेळ हा नियतीचा
मांडलेल्या प्रत्येक डावाचा
शेवट हा ठरलेला...!!
कळीच्या उमलण्याचा
जो असतो साक्षीदार,
तोच सुगंधाचा प्रथम हक्कदार ...!!
म्हणूनच म्हणतो... गड्या
असत्याकडे धावता धावता
अंतिम सत्यच न विसरावं...!!
जगणं हे ज्याचं त्याचं
त्याच्यावर ते सोडावं...!
उगाच हे न व्हावं
जगण्याच्या शर्यतीत
मरणच विसरावं...!!
#जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃

खूप भारी लिहिलंय....❤️❣️
ReplyDeleteधन्यवाद....!!!
Deleteमास्तर खूपच छान
ReplyDeleteधन्यवाद...🙏😀
ReplyDelete