Tuesday, September 9, 2025

आयुष्य हे...!!

 


निवांत एखाद्या कातरवेळी

मन डोकावत असतं पाठीवरच्या गाठोड्यात,

कुपीतल्या बकुळीच्या सुगंधाने मढवलेल्या

मखमली कापडात बांधून ठेवलेल्या क्षणांना...!

दिवसेंदिवस सुगंधित होण्याच्या कलेचं

तेव्हा मात्र अप्रूप वाटतं...

आपलंच गाठोडं, आपलीच कुपी

आपलेच क्षण, आता मात्र कातरवेळेच्या क्षितिजासम भासतात .... सुंदर , शांत पण पुन्हा हाताशी कधीच न येणारे....!!

#आयुष्य_हे

#जिंदगी_का_फंडा🍃

No comments:

Post a Comment

अटळ 'अर्जुन'तम...!!

  प्रत्येकाची स्वतंत्र ही लढाई, कधी कृष्ण, कधी अर्जुन तर कधी बनून कर्ण करायची उतराई...!! चूक बरोबर , चांगलं वाईट, याच्या परिसीमा व्यक्तीगणिक...