निवांत एखाद्या कातरवेळी
मन डोकावत असतं पाठीवरच्या गाठोड्यात,
कुपीतल्या बकुळीच्या सुगंधाने मढवलेल्या
मखमली कापडात बांधून ठेवलेल्या क्षणांना...!
दिवसेंदिवस सुगंधित होण्याच्या कलेचं
तेव्हा मात्र अप्रूप वाटतं...
आपलंच गाठोडं, आपलीच कुपी
आपलेच क्षण, आता मात्र कातरवेळेच्या क्षितिजासम भासतात .... सुंदर , शांत पण पुन्हा हाताशी कधीच न येणारे....!!
#आयुष्य_हे
#जिंदगी_का_फंडा🍃
No comments:
Post a Comment