ना तमा मज ऊन-वाऱ्याची,
पाऊसकाळाची,
आस फक्त पैलतीरावर जाण्याची,
लडखडलेच पाय कधी,
लागून ठेच झालीच जखम कधी,
तरी थांबणं हे रक्तात नाही,
वाटेवरून त्याच चालताना,
उमटतील अनेक पाऊलखुणा,
त्याच सांगतील कहाण्या,
प्रत्येक पावलांच्या, प्रत्येक जखमांच्या,
म्हणून नको मज सहानुभूती,
नको मज आता ही अनुभूती,
फक्त इतकंच साकडं ईश्वरास,
छोटेखानी हा प्रवास,
दाखवावी वाट वाटाड्यास,
भागवावी भूक भुकेल्याची,
द्यावं ओंजळीत पाणी तहानलेल्याच्या,
कधी काळ्याकुट्ट अंधारात ,
दाखवावा किरण प्रकाशाचा,
द्यावा चाचपडणाऱ्यास हात मदतीचा,
जे जे चांगलं तेच उरावं,
जे वाईट ते जळून खाक व्हावं,
अनंतात विलीन होताना,
खंत नसावी निरोप घेताना,
असावं स्मित हास्य नवजात बालकासम
करावा महोत्सव कातरवेळीच्या सुर्यासम.....!!!
#प्रवास❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Mastach की हेपण करता का good
ReplyDelete😄 वेळ मिळेल तसं जपतो हे
ReplyDeleteधन्यवाद
प्रवासाचा उद्देश समजला की मार्ग असाच पारदर्शक बनतो!
ReplyDeleteKeep Writing!
🙏🙏😊
Delete